नागपूर/दै.मू.समाचार
हिंदू धर्माच्या नावाखाली ओबीसी ब्राह्मण धर्माचे अनुयायी बनतात आणि त्याच ब्राह्मण धर्माने ओबीसींना हजारो वर्षांपासून हक्क दिलेले नाहीत. ज्यांनी हजारो वर्षांपासून ओबीसींना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवले ते लोक त्यांची ओबीसी म्हणून का गिनती करतील. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात ओबीसींना हिंदूंच्या नावाने नव्हे तर ओबीसींच्या नावाने अधिकार दिले आहेत. मात्र हिंदू धर्माच्या ठेकेदारांनी मोजणीच्या नावाखाली ओबीसींना ब्राह्मणांच्या खात्यात टाकले, असा घणाघात बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी केला. ते नागपुर येथ आयोजित बामसेफ आणि भारत मुक्ति मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलत होते.
भारत मुक्ती मोर्चाच्या 13व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्राचा समारोप करताना वामन मेश्राम म्हणाले, 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटना लागू झाली. राज्यघटनेनुसार या देशातील जनतेला देशाचे नागरिक मानले जात होते. संविधानाची संकल्पना ‘भारतीय नागरिक’ आहे आणि तिच्या नावावर अधिकार देण्यात आले आहेत. अधिकार दिल्यामुळे लोकांना जाणीव झाली की ज्या देशात ज्यांची सर्वाधिक संख्या आहे, त्या देशात त्यांच्या संख्येच्या प्रमाणात अधिकार का नाहीत? त्यामुळे स्वातंत्र्य चळवळीच्या काळातही जातीवर आधारित मोजणीचा मुद्दा निर्माण झाला आणि स्वातंत्र्यानंतर राज्यघटना लागू झाल्यानंतर काँग्रेसने ओबीसीचा मुद्दा दाबण्याचा प्रयत्न केला. कारण तेव्हा काँग्रेसचे राज्य होते, म्हणजेच पूर्णपणे ब्राह्मणांचे राज्य होते.
ते म्हणाले, 1950 मध्ये देशात झालेल्या पहिल्या निवडणुकीत काँग्रेसने 3.5 टक्के ब्राह्मणांना 60 टक्के तिकिटे दिली. अशा प्रकारे स्वतंत्र भारतात ब्राह्मणांचे नियंत्रण आले. विश्लेषण केले तर लक्षात येईल की 3.5 टक्के ब्राह्मणांना ६० टक्के तिकिटे देणे म्हणजे ५६.५ टक्के ब्राह्मणांनी त्यांच्या हक्कांवर अतिक्रमण केले. तर या ५६.५ टक्के पैकी केवळ ५२ टक्के ओबीसी आहेत. म्हणजे काँग्रेसने केवळ ५२ टक्के ओबीसींच्या खात्यातील तिकीटे ब्राह्मणांना दिली.
ते पुढे म्हणाले, एससी, एसटीला राजकीय आरक्षण होते, त्यामुळे त्यांना आरक्षण द्यावे लागले. काँग्रेसने जातीच्या आधारावर ओबीसींची गणना केली नाही, असेही ते म्हणाले. पण हे बरोबर नाही, मग बरोबर काय? ज्या काँग्रेसने 52 टक्के ओबीसींची गिणती केली नाही तेच लोक 1951 मध्ये दर दहा वर्षांनी हिंदूंच्या नावाने ओबीसींची गिनती करायचे. आमचे लोक म्हणतात की ओबीसींची गणना होत नाही, हे अर्ध सत्य आहे. पण संपूर्ण सत्य काय आहे? संपूर्ण सत्य हे आहे की काँग्रेसच्या लोकांनी ओबीसींकडे दुर्लक्ष केले. हिंदूंच्या नावावर त्यांची गणना केली. अशा प्रकारे ओबीसी हिंदूच्या खात्यात टाकण्यात आले. हिंदू हा हिंदू धर्म मानला तर हिंदू धर्माचा ठेकेदार ब्राह्मण म्हणजेच ओबीसी हिंदूच्या नावाने ब्राह्मणांच्या खात्यात टाकण्यात आला आहे. सरळ अर्थ असा की ओबीसींची मते ब्राह्मणांच्या खात्यात टाकली त्यामुळे ओबीसींचे खाते शून्य झाले.
काँग्रेसचे लोक हे काम गपचूप करत होते त्यामुळे लोकांना त्याची माहिती नव्हती. तर भाजपवाले हे उघडपणे करत आहेत. उघडपणे बोलायची हिम्मत त्याला कुठून आली? काँग्रेस जेव्हा हिंदू-हिंदूचा जप करत राहिली, तेव्हा काँग्रेसच्या काळात ब्राह्मण हिंदूकरणाचे काम करत राहिले. ब्राह्मणांनी ओबीसींचे हिंदूकरण केल्यावर ते हिंदू धर्माचे अनुयायी केव्हा झाले हे ओबीसींनाही कळले नाही. ब्राह्मण हे ब्राह्मण धर्माच्या नावाखाली ब्राह्मण धर्म पाळत नाहीत, तर हिंदू धर्माच्या नावावर ब्राह्मण धर्म पाळत आहेत. जेव्हा मी सांगितले की हिंदू धर्माचे खरे नाव ब्राह्मण धर्म आहे, हिंदू धर्म नाही. हिंदू हे मागासवर्गीयांना मूर्ख बनवण्यासाठी म्हणत आहेत. जेणेकरून त्यांचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करता येईल. जर संविधानाने 18 वर्षांच्या व्यक्तीला मतदानाचा अधिकार दिला नसता तर ब्राह्मणांनी त्यांना हिंदूही म्हटले नसते. ब्राह्मण त्यांना शूद्र म्हणतात.
वामन मेश्राम म्हणाले, बाबासाहेब आंबेडकरांना या सर्व गोष्टी समजल्या. आज बामसेफ समजते. जास्त शिकलेले लोक म्हणतात की बामसेफचे लोक आंबेडकरवादी नाहीत, का? कारण ते लोक फारसे आंबेडकर जिंदाबाद म्हणत नाहीत. मात्र देशभर फुले, शाहू, आंबेडकर यांच्या चळवळींना समोर घेऊन जाण्याचे व त्यांच्या विचारांचा प्रसार, प्रचार करण्याचे काम केवळ बामसेफचे लोक करत आहेत.
शेवटी त्यांनी ओबीसींच्या जातिनिहाय जनगणनेवर प्रश्न उपस्थित करत ओबीसींची जातिनिहाय जनगणना का होत नाही? ओबीसींची संख्या कोटीत असताना ओबीसींनी मागणी केल्यास ओबीसींची मोजणी केली जावी, मात्र त्यांची संख्या ही कोटी असूनही ओबीसींचे लोक मोजण्याची मागणी करत नाहीत, का? कारण ओबीसी हिंदू झाला आहे. तेव्हा हिंदू झालेले ओबीसींचे लोक आपल्या जातीची मोजणी करण्याची मागणी का करतील? हिंदू धर्माच्या नावाखाली ओबीसी हे ब्राह्मण धर्माचे अनुयायी बनतात आणि त्याच ब्राह्मण धर्माने हजारो वर्षांपासून ओबीसींना अधिकार दिलेले नाहीत. ज्यांनी हजारो वर्षांपासून ओबीसींना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवले ते लोक त्यांची ओबीसी म्हणून का गिनती करतील? बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात ओबीसींना हिंदूंच्या नावाने नव्हे तर ओबीसींच्या नावाने अधिकार दिले आहेत. ही गोष्ट ओबीसींमध्ये समजावून सांगण्याची गरज आहे, असेही वामन मेश्राम म्हणाले.
मोफत 70,000 विटा दिल्या तरी आमदार रवी राणा यांच्या आदेशावरून बुलडोझर कारवाई, वीटभट्टी व्यावसायिकांचा आरोप
अमरावती/दै.मू.वृत्तसेवाअमरावती शहरातील बडनेरा ते कोंडेश्वर मंदिर मार्गावर असणाऱ्या सुमारे साडेतीनशे वीटभट्ट्यांवर बुधवारी सकाळी कारवाई करण्यासाठी अनेक बुलडोझर, महसूल विभागाचे अधिकारी...