नवी दिल्ली/दै.मू.वृत्तसेवा
लोकसभेच्या मतदानादरम्यान येत असलेल्या सर्व्हेनुसार ही निवडणूक भाजपासाठी सोपी नाही, असे सांगितले जात आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांना याबाबत न्यूज 24 वृत्तवाहिनीच्या मुलाखतीमध्ये म्हणाले कि कोणतीही निवडणूक सोपी नसते. यानंतरही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोठा दावा केला आहे. शाह म्हणाले कि निकालाच्या दिवशी दुपारी 12.30 च्या आधी एनडीए खासदार संख्या 400 पार करणार.
लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे पार पडले आहेत. आता प्रतीक्षा आहे ती तिसऱ्या टप्प्याची. वेगवेगळे दावे काँग्रेसकडून आणि इंडिया आघाडीकडून केले जात आहेत. मोदी पुन्हा सत्तेत आले तर ते संविधान बदलतील असाही आरोप विरोधक करत आहेत. तर दुसरीकडे पंतप्रधान मोदींसह भाजपातले सगळेच नेते भाजपा आणि एनडीएने कसा विकास केला काय काय कामं केली ते सांगत आहेत. अशातच भाजपाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोठा दावा केला आहे.
अमित शाह म्हणाले कि एनडीएची गाडी पूर्णपणे ट्रॅकवर आहे. निकालाच्या दिवशी तुम्हाला दिसेल की, एनडीए ही 12ः30 वाजेच्या आधी 400 पार करेल. ४०० पारचं लक्ष्य आम्हाला मोठं वाटत नाही. ते सहज पार होईल.मोदीजी हे पुन्हा पंतप्रधान होतील. मतदानाची टक्केवारी कमी होण्यामागे अनेक कारणं आहेत. तब्बल 12 वर्षांनंतर मतदार यादी अद्ययावत करण्यात आली आहे.
दुसरे कारण म्हणजे, समोरुन तुल्यबळ विरोधक नाही. त्यामुळे मतदानावर एक प्रकारचा परिणाम होत आहे. पण आमच्या पक्षाच्या टीमने आणि मी स्वतः खूप तपशीलवार विश्लेषण केलं आहे. दोन टप्प्यात 100 पेक्षा जास्त जागा जिंकून आम्ही आघाडी घेतली आहे. परिणामी मला 400 पारचं लक्ष्य मोठं वाटत नाही. असेही ते म्हणाले.
आमच्या समोर तुल्यबळ म्हणावा असा किंवा आमच्या तोलामोलाचा विरोधक नाही. त्यामुळे मतदानावर एक प्रकारचा परिणाम होतो आहे. गाव, शहर, जंगल, वाळवंत, समुद्र किनारे किंवा शहरातले इतर भाग. पायाभूत सुविधांच्या बाबतीत खूप मोठी कामं होत आहेत. त्यामुळे देश पुढे जातो आहे.
रामजन्मभूमी, नवीन आर्थिक धोरण, उच्च शिक्षण, कलम 370 रद्द करणं, तिहेरी तलाक संपवणं, फौजदारी कायद्यांमध्ये करण्यात आलेले बदल या महत्त्वाच्या निर्णयांमुळे हे शक्य होणार आहे. तसंच करोना सारख्या महामारीशी आपल्या देशाने खूप उत्तम प्रकारे सामना केला. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामुळेच हे शक्य झालं, असंही अमित शाह म्हणाले आहेत.