डिलिस्टिंग कायदा झाला तर आदिवासिंचा सत्यानाश तय, एच.एन.रेकवाल यांची चेतावनी
नागपुर/दै.मू.वृत्तसेवा
डिलिस्टिंग कायदा झाला तर आदिवासिंचा सत्यानाश निश्चित आहे, अशी चेतावनी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष एच.एन.रेकवाल यांनी रविवारी दिली. ते नागपुर येथे आयोजित बामसेफ आणि भारत मुक्ति मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलत होते.
एच.एन.रेकवाल पुढे म्हणाले कि बाबासाहेब आंबेडकर यांनी आदिवासींना अनुच्छेद 244 अंतर्गत विशेष अधिकार दिले होते. म्हणजे संविधानाच्या आत एक आणखी संविधान दिले होते. संविधानाच्या पाचवी अनुसूचीच्या अनुसार, जल, जंगल आणि जमीन यांचा मालक आदिवासी असेल. जमीनीत असलेले अनेक प्रकारचे धातूंचा मालक आदिवासी होईल. त्या आदिवासी क्षेत्रात ट्रायबल अडवायजरी काउंसिल आणि आदिवासी ग्रामसभा यांच्या परवानगी विणा विकासाची कोणतीही कामे होणार नाही. किंवा अशा क्षेत्रात कोणीही घुसपेठ करू शकत नाही. आदिवासींचे स्वायत्त शासन असेल. मालकीचा अधिकार असेल. या प्रकारचे अधिकार समाप्त करण्यासाठी
डिलिस्टींग चा कायदा पूढे रेटत आहेत.
हा कायदा त्या आदिवासींच्या माध्यमातून पुढे केल्या जात आहे, ज्यांना ब्राह्मणांनी हिंदू बनवीले आहे. सध्या डिलिस्टिंगचा नागपुर येथून एक वीडियो आला होता. आमच्या यूटयूब चैनलचे पत्रकार त्यांच्यासोबत होते. जेव्हा डिलिस्टिंगवरून नागपुरात आंदोलन शुरू होते. ते पोहचले. त्यांच्यासोबत चर्चा केली. तीन मिनिटात त्यांनी
सांगितले. त्यांना विचारली की काय तुम्ही डिलिस्टिंच्या समर्थनात आहात. असले पाहिजे. एकाने प्रश्न विचारला कि डिलिस्टिंगसाठी आपन एवढया संख्येने आला आहात, त्यासाठी साधन आणि संसाधन कोण देत आहे? तुमच्या येण्याचा आणि जेवणाचा खर्च. तो स्पष्टपणे सांगत आहे कि आरएसएस, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल. याचा अर्थ असा कि जेवढे आंदोलन होत आहेत, आम्ही असे म्हणू शकतो कि बामसेफच्या व्यतिरिक्त जेही एससी, एसटी, आबीसींच्या संघटना सुरू आहेत, त्या प्रत्यक्ष या अप्रत्यपणे आरएसएस, विश्व हिंदू परिषदेच्या मदतीने सुरू आहेत. त्यांचा एकमात्र उद्देश आहे कि बामसेफचे आंदोलन यशस्वी होऊ नये. म्हणून या षडयंत्राला समजण्याची आम्हाला आवश्कता आहे, असेही रेकवाल म्हणाले.
जर डिलिस्टिंगचा कायदा झाला तर आदिवासींचा सत्यानाश होने तय आहेच. जेव्हा- जेव्हा एससी, एसटी आणि ओबीसीच्या लोकांनी धर्मपरिवर्तन केले. कारण कि जर हा कायदा बनला तर तो सर्वांना लागू होईल. तुम्हाला वाटत असले की हा तर आदिवासींचा मसला आहे. त्यामुळे आम्ही गलतफॅमी मध्ये राहू नये. जर
डिलिस्टिंगचा कायदा बनला तर जे काही लोक मुस्लिम, ईसाई, सिख बनले, त्या सर्वांची डिलिस्टिंग होईल. याचा सर्वांवरण परिणाम होईल. त्यामुळे ब्राह्मणांच्या या षडयंत्राची पोलखोल करण्यासाठी सर्व प्रकारचे जे एससी, एसटी आणि ओबीसीचे समूह आहेत, या सर्वांना आपली जबाबदारी पार पाडण्याची गरज आहे. असा आग्रह रेकवाल यांनी उपस्थित जनसमुहास केला.
ज्या महापुरूषांनी आम्हाला 2500 वर्षांनंतर जे अधिकार दिले आहेत, ते आता संपण्याच्या मार्गावर आहेत.येणाÚया हजारो पिढयांचे भवितव्य अंधारात आहे. जर खरच तुम्ही त्यांना स्वतंत्र करू ईच्छित असाल तर मा. वामन मेश्राम साहेबांचे एकमात्र नेतृत्व आहे, जे सर्व सामाजिक समुहांना सोबत घेऊन हे आंदोलन पुढे घेऊन जात आहे. त्यांनी या संघटनेला राष्ट्रीयच नाही तर आंतरराष्ट्रीय स्वरूप दिले आहे. तुम्ही ही बाब समजून घ्याल व कार्यकर्ताच्या रूपाने काम करण्यास पुढे याल, आपल्या हजारो पिढयांसाठी. लोक आपल्या महापुरूषांचा जयजयकार करतात. काय महापुरूषांनी त्यांचा जयजयकार करण्याचा ठेका आम्हाला दिला आहे. महापुरूषांपासून आपन काय प्रेरणा घेत आहोत. त्यांनी या व्यवस्थेच्या विरोधात युद्ध लडले होते. आणि आज जेव्हा आमच्या हजारों पिढींचे भविष्य अंधारात असताना आम्ही महापुरूषांचा जयजयकार करीत आहोत. या आंदोलनाला आम्ही समजून घेतले पाहिजे आणि कार्यकर्ता म्हणून काम केले पाहिजे, असे आवाहन रैकवाल यांनी केले.