नवी दिल्ली/दै.मू.वृत्तसेवा
कोरोना वॅक्सीन कोविशिल्ड शरीरामध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला ब्रेन स्ट्रोक, कार्डियक अरेस्ट होण्याची शक्यता वाढते. असे लस तयार करणाऱ्या एस्ट्राजेनेका कंपनीने यूकेच्या हायकोर्टात मान्य केले आहे. यांनतर कोरोना लसीबाबतचा वाद आणखी वाढला आहे. याबाबत विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. अशातच आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी कोरोना वॅक्सिन कोविशिल्डमुळे झालेल्या मृत्यूंच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे. तसेच त्यामागे कोण आहेत हे शोधून काढले पाहिजे असीही मागणी त्यांनी केली आहे.
कंपनीच्या मालकांवर हत्येचा गुन्हा दाखल करून जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी. कोरोना लस कोविशिल्डचे आता गंभीर परिणाम होत आहेत. आज 25-30 वर्षांचे तरुण चालताना पडत आहेत. हे खरे आहे की आज लोक मरत आहेत. हे लोक कोविशिल्डमुळे मरत आहेत. त्याचे तथ्यही समोर आले आहे. अशा परिस्थितीत लोकांच्या मृत्यूवर कंपन्यांकडून नुकसानभरपाई वसूल करावी, असं आप नेत्याने म्हटलं आहे.
तसेच समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही यावरून भाजप सरकारवर जोरदार निशाना साधला आहे. अखिलेश यादव म्हणाले कि भाजपाच्या लोकांनी ज्या पद्धतीने प्रचार केला आणि लोकांना लसीकरण करा, असं सांगितलं, तोही घोटाळा निघाला. जनता मतदानाने या खोट्याचा हिशोब करेल, असं म्हटलं आहे. अखिलेश यादव म्हणाले की, कोरोना लसीबाबत ज्या प्रकारे वाद सुरू झाला आहे त्यामुळे लोकांना हार्ट अटॅक येत आहे आणि जगातील सर्वात शक्तिशाली न्यायालयाने या लसीबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. भाजपावाल्यांनी सर्वांना एकाच प्रकारची लस दिली. जर दोन डोस दिले गेलेत तर 80 कोटी लोकांना ते दिले गेले.
भाजपावर निशाणा साधत सपा अध्यक्ष म्हणाले की काही जण ही देखील माहिती देत आहेत की जेव्हा कोरोनाची लस तयार झाली तेव्हा ज्या लोकांनी अप्रूव्हल दिलं त्या लोकांनी लस घेतली नाही आणि सर्वसामान्य लोकांना लस देण्यात आली आहे. अखिलेश यांनी आता लसीचं उत्तर हे मतदान करून देण्यास सांगितलं आहे. ते म्हणाले, आता भाजपाला मतदान न करता, त्यांनी जनतेला जे खोटं सांगितलं त्याचा हिशोब करा.“
अखिलेश यादवच नाही तर विरोधी पक्षांचे नेतेही लसीबाबत सरकारवर निशाणा साधत आहेत. सपा नेते राम गोपाल यादव म्हणाले की, यूके कोर्टात जवळपास 51 खटले दाखल करण्यात आले आहेत. कोरोना लसीमुळे ब्रेन स्ट्रोक आणि हार्ट अटॅक यांसारखे आजार होत आहेत. त्याचे दुष्परिणाम भारतातही समोर आले आहेत.
काँग्रेस नेते दीपेंद्र सिंह हुड्डा यांनी एक्स वर लिहिले की कोरोना लस कोविशिल्ड बनवणाऱ्या कंपनीने महामारीच्या काळात भाजपला करोडो रुपयांची देणगी का दिली? हा एक गंभीर विषय आहे, कारण कोविडच्या काळात प्रत्येक व्यक्ती मानवतेसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करत होती. अशा स्थितीत लसीकरण करणाऱ्यांकडून देणग्या घेणे भाजपच्या सर्वात श्रीमंत पक्षाच्या समजण्यापलीकडचे आहे, तर दुसरीकडे देणग्या घेण्याच्या नावाखाली भाजपला चुकीची लस का दिली, असा आरोप राजदने केला आहे.
निवडणूक आयोगाने आपल्या वेबसाइटवर इलेक्टोरल बाँडबाबत सार्वजनिक केलेल्या डेटानुसार भाजपला 6,060 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. या देणगीच्या रकमेबाबत विरोधकांनी कोविशील्ड वादावर भाजपवर प्रश्न उपस्थित केले आहेत. देणग्या’ गोळा करण्यासाठी करोडो देशवासीयांना चुकीची लस दिली जात असल्याचा आरोप भाजपवर आहे. या प्रकरणाबाबत लोकांमध्येही संताप दिसून येत आहे. विरोधकांनी पंतप्रधान मोदींनाही धारेवर धरले असून 52 कोटींच्या निवडणुकीतील देणग्यांसाठी 140 कोटी लोकांच्या जीवाची खरेदी का केली? असा सवाल केला जात आहे
आता हे सर्व प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. याचिकेत करोना काळात कोव्हिशिल्ड लस घेतल्यानंतर गंभीर अपंगत्व आलेल्या किंवा मृत्यू झालेल्यांच्या नातलगांना नुकसानभरपाई देण्याचे निर्देश न्यायालयाने केंद्राल द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच कोर्टाने एम्सच्या डायरेक्टरच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांचे एक पॅनेल स्थापन करण्याचे निर्देश द्यावे, अशी मागणी याचिकेत केली आहे. या समितीत सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत न्यायाधीश यांच्या निगराणीखाली कोव्हिशिल्डमुळं निर्माण होणारे धोके आणि साइडइफेक्टची चाचपणी व्हावी, असं देखील याचिकेत म्हटलं आहे.