नवी दिल्ली/दै.मू.वृत्तसेवा
लोकसभा निवडणूक एकूण सात टप्प्यांत होत असून यापैकी तीन टप्पे पार पडले आहेत. तिसऱ्या टप्प्यासाठी 7 मे रोजी मतदान झाले. तिसऱ्या गुजरातमधील 25 जागांसाठी मतदान झाले. मात्र, गुजरातमधील तीन गावांमध्ये शून्य टक्के मतदान झाले असल्याची माहिती समोर आली आहे. या तीनही गावातील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकला. त्यामुळे दिवसभर एकही मतदार मतदान केंद्राकडे फिरकला नाही.
तीन गावामध्ये मिळून जवळपास एक हजारांपेक्षा जास्त मतदार आहेत. मात्र, एकही मतदार मतदान केंद्राकडे न फिरकल्यामुळे दिवसभर मतदान केंद्र ओस पडल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी मतदान करण्यासाठी आवाहन केले होते. पण त्यानंतरही येथील मतदार आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. या तीनही गावातील लोकांचे म्हणणे आहे, सरकारकडून आमच्या कोणत्याही मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे विकासकामे नाही तर मतदान नाही अशी भूमिका या गावकऱ्यांनी घेतली.
गुजरातचे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणाले की, प्राथमिक माहितीनुसार, भरूच जिल्ह्यातील केसर गाव, सुरत जिल्ह्यातील सुंधरा आणि बनासकांठा जिल्ह्यातील भाकरी गावातील मतदारांनी मतदानावर पूर्णपणे बहिष्कार टाकला. जुनागड जिल्ह्यातील भटगाम गाव आणि महिसागर जिल्ह्यातील बोडोली आणि कुंजरा गावातील मतदारांनी त्यावर अंशतः बहिष्कार टाकला. बारडोली लोकसभा मतदारसंघांतर्गत संधारा गाव येत असून येथे 320 मतदार आहेत.
निवडणूक आयोगाच्या अहवालानुसार, 320 मतदारांपैकी एकाही मतदाराने काही प्रलंबित मुद्द्यांवर मतदान केले नाही. स्थानिक निवडणूक प्रशासन आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी त्यांना बाहेर पडून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पटवून देण्याचा प्रयत्न केला. पाटण लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या भाखरी गावातील सुमारे 300 मतदारांनीही त्यांच्या ग्रामपंचायतीच्या विभाजनाच्या निषेधार्थ मतदानावर सामूहिक बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. स्पष्टीकरण देऊनही ते त्यांच्या मताधिकाराचा वापर न करण्याच्या निर्णयावर ठाम राहिले.
भारतीय जनता पक्षाचे उमेदवार भरतसिंह दाभी यांनीही गावात पोहोचून त्यांना मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याची विनंती केली, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. भरुच जिल्ह्यातील केसर गावातही सुमारे 350 मतदार मतदान न करण्याच्या निर्णयावर ठाम राहिले आणि दिवस संपेपर्यंत एकही मतदान झाले नाही.
भाजपाचे उमेदवार भरतसिंह डाभी यांनीही या गावात पोहोचून लोकांना मतदान करण्याची विनंती केली. पण तरीही लोकांनी मतदान न करण्याची भूमिका घेतली. तसेच जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनीही या मतदारांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याचाही काही उपयोग झाला नाही.