चौधरी विकास पटेल यांचा घणाघात
भारतात आता धर्माच्या नावावरही भांडण होताना दिसून येत नाही. आरएसएस आणि बीजेपीकडून हिंदू-मुस्लिमांमध्ये ज्या दंगली घडवल्या जात होत्या. त्या आता बंद झाल्या आहेत. कारण ओबीसी आता जागृत झाला आहे आणि त्यांना माहित झाले आहे कि दंगली घडवण्यासाठी आमचा वापर केला जात आहे. याचा आम्हाला फायदा मिळत नाही, असा घणाघात राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी विकास पटेल यांनी रविवारी केला. ते नागपुर येथे आयोजित बामसेफ आणि भारत मुक्ति मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशातील उद्घाटन सत्रात बोलत होते.
बामसेफच्या बिजारोपणाला 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मी तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो. कारण बहुजन समाजाचे कार्य मागे पडू दिले नाही आणि हे काम सतत पुढे जात आहे. ते वाढतच चालले आहे. 50 वर्षांपासून समाजात सतत कार्यरत आहे. जेव्हा आम्ही म्हणायचो कि ज्या दिवशी हे मुद्दे समाजात प्रस्थापित होतील तया दिवसी आमच्या समाजातील राजकीय नेत्यांना आमची बोली बोलावी लागेल, आम्ही शत्रूंनाही आमची बोली बोलवायला भाग पाडू. असे बामसेफला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ही बाब दिसून येत आहे.
आरएसएसचे लोक संभ्रमात आहेत, त्यांना कळून राहीलेले नाही कि जातिनिहाय जनगणनेचे समर्थन करायचे कि विरोध करायचा. कारण एक दिवस ते म्हणतात कि आम्ही याच्या विरोधात आहोत तर एक दिवस म्हणतात कि आम्ही याच्या समर्थनात आहोत. जे लोक जातीनिहाय जनगणनेचा विरोध करत होते ते आज याचे समर्थन करत आहे. हा संभ्रम निर्माण झालेला नाही. आरएसएस आणि भाजपाचे लोक याचं अवलोकन करत आहेत.कारण बामसेफने एवढी जागरुकता निर्माण केली आहे कि आता 52 टक्के ओबीसींनी विरोध केला तर 2024 ची निवडणूक जिंकता येणार नाही, म्हणून गोड भाषा बोलली जात आहे. त्यांना जातीनिहाय जनगणना करायची नाही, परंतु याबाबत गोड बोलुन मते मिळवायची आहेत. तेव्हा बहुजन समाजाला असतील तर थोडे सावध राहण्याची गरज आहे. असा आग्रह विकास पटेल यांनी केला.
जे आरएसएसचे लोक म्हणायचे कि मुस्लिम हे परदेशी आहेत. आता मोहन भागवत काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत प्रत्येकाचा डीएनए एक आहे असे म्हणतात. बामसेफच्या माध्यमातून देशभर मोहीम राबविण्यात आली की ब्राह्मण विदेशी आहेत? बाकी सर्व मूळनिवासी आहेत. बामसेफने ही मोहीम देशभरात सुरू केली होती आणि आज ही गोष्ट आपन चौका-चौकात स्थापन झाली आहे. चौकात असलेल्या व्यक्तीला विचारा कि हे स्थापित कोनी केले? तेव्हाच त्याला कळते की तू कोण आहेस. या समजुतीत हे प्रस्थापित करण्याचे कामही झाले आणि त्यामुळे आरएसएसची बोलीभाषा बदलली आहे. आरएसएस माफी मांगत सांगत आहे कि आमच्या पूर्वजांनी जातिव्यवस्था आणि वर्णव्यवस्था निर्माण करून मोठी चूक केली आहे. त्याचे प्रायश्चित्त आम्हाला भोगावे लागणार आहे. असेही विकास पटेल म्हणाले.
जे कालपर्यंत आरक्षणाला विरोध करत होते, ते आज 200 वर्षांपासून आरक्षण राहिले पाहिजे असे म्हणत आहेत. आणि दुसरीकडे ते खासगीकरण करून आरक्षण संपवण्याचे काम करत आहेत. बामसेफच्या दबावामुळे हे सर्व होत आहे. बामसेफने समाजात या बाबी पस्थापित केल्या आहे की आता देशातील बहुजनांचे प्रश्न न मांडता कोणताही राजकीय पक्ष यशस्वी होऊ शकत नाही. ते बहुजनांचे प्रश्न मांडने ही प्रत्येकाची मजबुरी बनली आहे. जसे बाबासाहेब आंबेडकर जेव्हा चालवत असत. जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ चालवित असत तेव्हा त्यांच्या चळवळीत लोक सामिल झाले नाही पाहिजे यासाठी आरएसएसचे लोक घरोघरी खिचडी खाऊ घालण्याचा कार्यक्रम राबवत आहेत. धान्य गोळा करून खिचडी बनवून एकाच ठिकाणी खाऊ घालण्याचा कार्यक्रम सुरू आहे. जेणेकरून मेश्राम साहेबांनी चालविलेल्या आंदोलनाशी लोक जोडले जात आहेत. हे होऊ नये यासाठी दिशाभूल करण्याचा कार्यक्रमही सुरू आहे. असेही विकास पटेल म्हणाले.
बामसेफकडून ओबीसीचा मुद्दा अनेक दिवसांपासून उपस्थित केला जात आहे. प्रधानमंत्री ओबीसींचा आहे, असा प्रचार यासाठी केला जात आहे कि जिथे खरी लढाई लढली जात आहे तिथे ओबीसींनी जुडू नये. जेनेकरूण ओबीसींना यात गोवण्यात यावे आणि त्यांचे हक्क डावलले जावेत, असा प्रचार केला जात आहे. या सर्व बाबी या देशात सुरू आहे. त्यामुळे समजून घेण्याची गरज आहे. संविधानाला धोका आहे? म्हणून या गोष्टी समजून घ्यायला हव्यात. असेही ते म्हणाले.
आज बिहारमध्ये जाति जनगणना झाली नाही. कारण जनगणना करण्याचा अधिकार केंद्र सरकारकडे आहे.सर्वेक्षण केले होते तर नितीश कुमार जी 16 वर्षे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी जातिजनगणा आता का केली. या आधी का केली नाही. ही बाब चुकीची आहे असे नाही. माझे म्हणणे स्वागतार्ह आहे कारण जर जनगणनाही झाली आणि संख्येच्या प्रमाणात आरक्षण वाढले तर त्याचे स्वागतच आहे, पण आम्ही ते आधी केले नाही, आता का करतो, कारण आता बामसेफची विचारधारा समाजात प्रस्थापित झाली आहे. उत्तर प्रदेशात एकेकाळी राजकीय पक्षांचे लोक शेड्युल कास्टच्या लोकांचे डिमोशन करत होते. आज पीडीए ची गोस्ट करत आहेत. असेही ते म्हणाले.
मेश्राम साहेब तासभर ओबीसींच्या मुद्यांवर बोलत असत. तेव्हा कार्यक्रमात बोटावर मोजण्याइतके लोक राहत असत. पण आज फक्त आपल्या राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाच्या मोठमोठ्या परिषदा होत आहेत. प्रत्येक कार्यक्रमाला ओबीसी लोक हजर राहत आहेत आणि चळवळ पुढे नेण्यासाठी लाखो रुपये आंदोलन नीधी देत आहेत. ही चेतना ओबीसींमध्ये बामसेफने निर्माण केली आहे. याचा परिणाम असा झाला कि पूर्वी अनुसूचित जाती आणि ओबीसी आपापसात भांडत असत. परंतु आज ओबीसी त्यांच्यासोबत लढायला तयार नाही. असे विकास पटेल म्हणाले.
मी म्हणालो की ओबीसी अनुसूचित जातीशी लढणार नाही आणि ओबीसी अनुसूचित जमातीशी लढणार नाही, ओबीसी अल्पसंख्याकांशी लढणार नाही, आणि अल्पसंख्याक ओबीसीशी लढणार नाही. कशासाठी कोणाशी लढणार, ओबीसी फक्त एकाच गोष्टीसाठी लढणार आहेत कि संख्या कितीही असो, हक्क आम्हाला मिळाले पाहिजेत, त्यासाठी आम्हाला लढावे लागेल. मागच्या वेळी जेव्हा आरएसएसच्या लोकांनी अयोध्येत बोलावले होते तेव्हा ओबीसी लोकांना तिथे बोलावतोय, मी तिथलाच आहे, म्हणूनच सांगतोय. ओबीसी लोक गेले नाहीत. ते का गेले नाहीत? कारण बामसेफने समाजात चेतना निर्माण केली आहे. मेश्राम साहेब, साडेचार लाख लोकांना घेऊन आरएसएसच्या मुख्यालयात गेले. ही मोठी गोष्ट आहे. मात्र ओबीसींच्या लोकांमध्ये आरएसएस विरोधात बयान देण्याची हिंमत नाही. असा निशानाही त्यांनी साधला.
आज परिस्थिती अशी आली आहे की ज्या पक्षांना जनआधार नाही किंवा त्यांच्याकडे कार्यकर्ते नाहीत, फक्त तेच आंदोलन करत आहेत का? संपूर्ण देशात गदारोळ का करत नाही? भारतात आता धर्माच्या नावावरही भांडण होताना दिसून येत नाही. आरएसएस आणि बीजेपीकडून हिंदू-मुस्लिमांमध्ये ज्या दंगली घडवल्या जात होत्या. त्या आता बंद झाल्या आहेत. कारण ओबीसी आता जागृत झाला आहे आणि त्यांना माहित झाले आहे कि दंगली घडवण्यासाठी आमचा वापर केला जात आहे. याचा आम्हाला फायदा मिळत नाही, ओबीसी जागृत झाल्याने आत तो दंगली करायला तयार नाही. गुर्जर, माळी सैनी या समुदायने एकत्र येवून ठरवलं कि आम्ही आपसात लढणार नाहीत. एससी, एसटी, ओबीसी अल्पसंख्याकांच्या हक्कासाठी आम्ही आपापसात भांडणार नाही. ही जाणीव बामसेफच्या माध्यमातून निर्माण केल्या गेली आहे, असेही ते म्हणाले.
सध्या राम मंदिराचा मुद्दा गाजत आहे, त्याला खूप हवा दिली जात आहे. पण लोकांना राम मंदिराचे उद्घाटन करायचे यामध्ये लोकांना फारसी आवड राहीलेली नाही. अयोध्येतील जिथे राम मंदिर बांधले जात आहे, त्या जागेचे उत्खनन केले असता त्यात बुद्धकालिन अवशेष सापडले. कारण तथागत बुद्धांनी तेथे 16 वर्षे वर्षवास केला होता. अयोध्या ही तथागत बुद्धाची भूमी आहे. तिचे नाव अयोध्या नाही तर साकेत आहे. साकेत ही भूमी बुद्धांची भूमी आहे, मूळ रहिवाशांची भूमी आहे. विशेषतः हा आपला गौरवशाली इतिहास आणि गौरवशाली वारसा आहे, हे जाणणाÚया लोकांना मूर्ख बनवने सोपे नाही. यामुळे आमचे दोन नुकसान होत आहे, एक, पूर्वीच्या ओबीसी वर्गातील लोकांचा गौरवशाली वारसा, तथागत बुद्ध आणि सम्राट अशोक यांचा गौरवशाली वारसा, हा वैभवशाली वारसा नष्ट करण्याचे काम केले जात आहे. मग ते काशी किंवा मथुरेचे प्रकरण असो.अयोध्येचे प्रकरण असो किंवा वेगळे, असेही ते म्हणाले.
दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन आम्ही सोमनाथ मंदिरावरही दावा केला की, सोमनाथ मंदिराच्या खाली तीन मजली विहार आहे. हा वारसा या देशातील मुळनिवासी लोकांचा आहे.
राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा हा केवळ मागासवर्गीयांच्या ओबीसींच्या हक्कांसाठी लढत आहे. यासोबतच देशातील महापुरुषांचा हा गौरवशाली वारसा वाचविण्यासाठी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कसोबत मिळून सामूहिक लढाई लढत आहे. हा संपूर्ण लढा सातत्याने बळकट होत आहे. आरएसएसचा उपचार हा राजकीय पक्ष नसून बामसेफ आहे. ही बाब समजून घेतली पाहिजे. आपली विचारधारा जिथे पोहोचेल तिथे हे समजून सांगितले पाहिजे, ते सर्व तुम्हाला सांगायचे आहे. बामसेफची विचारधारा प्रत्येक गावात आणि गल्लीपर्यंत पोहोचली पाहिजे. बामसेफच्या सर्व सहाय्यक संघटनांनी प्रत्येक गल्ली-बोळात आपल्या शाखा उघडाव्यात. यामुळे आरएसएस आपोआप हवेत उडून जाईल.