मुंबई/दै.मू.वृत्तसेवा
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटप आणि भविष्यातील रणनीती ठरविण्यासाठी काल महाविकास आघाडीची बैठक झाली. मात्र या बैठकीत जागावाटपावर तोडगा निघू शकला नाही. यानंतर साम टीवी या वृत्तवाहीनीने एक खोटी बातमी प्रसारीत केली. बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांनी महाविकास आघाडीला बिन शर्थ पाठिंबा दिला, असे वृत्त प्रसारीत केले. मात्र हे वृत्त खोटे असल्याचे स्वतः वामन मेश्राम यांनी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्रातील विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या महाविकास आघाडीतील (एमव्हीए) लोकसभा निवडणुकीच्या जागांचे वाटप आजही होऊ शकले नाही. जागावाटपाबाबतचा निर्णय पुढील सभेपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. बैठकीला राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार, त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार जितेंद्र आहवड, शिवसेनेचे (यूबीटी) अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि प्रवक्ते संजय राऊत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, भारत मुक्ति मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर उपस्थित होते. सुमारे चार तास चाललेल्या या बैठकीत जागावाटपाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मात्र जागा वाटपावरून तोडगा निघू शकला नाही.
यानंतर साम टीवी या वृत्तवाहीनीने एक वृत्त प्रसारीत केले. या वृत्तात असे म्हटले गेले की शरद पवार यांच्या विनंतीवरून वामन मेश्राम बैठकीला हजर होते. वामन मेश्राम यांनी महाविकास आघाडीला बिनशर्थ पाठिंबा दिला आहे.
यानंतर वामन मेश्राम यांनी साम टीवी दिलेल्या वृत्तावर आपले स्पष्टीकरण दिले आहे. वामन मेश्राम यांनी सोशल मीडिया प्लेटफॉर्म फेसबूक या साईट वर लिहिले कि, ‘मी आज महाविकास आघाडीच्या बैठकीला उपस्थित होतो. पण ज्या प्रकारे मीडियामध्ये सांगितले जात आहे की आम्ही महाविकास आघाडीला बिनशर्थ पाठिंबा दिला, ही बातमी पूर्णपणे खोटी आहे.