चंद्रपूर/दै.मू.वृत्तसेवा
ईव्हिएम मशीन हॅक होऊ शकत नाही किंवा त्यात गडबड केली जाऊ शकत नाही, असे कितीही निवडणूक अयोग म्हणत असले तरी लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान ईव्हिएम मशीन पर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आत आहेत.यापूर्वी एका प्राध्यापकाने ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेद्वारा निवडणूक प्रक्रिया घेतल्यास मतदान केंद्राध्यक्ष म्हणून सोपविलेली जबाबदारी पार पाडण्यास तयार आहोत’ असे पत्रच थेट जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले. मात्र आता यवतमाळ जिल्ह्यात ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करणे एका वन कर्मचार्याला चांगलेच महागात पडले आहे. वनविभागात नोकरी करणाऱ्या एका व्यक्तीने व्हॉट्सॲपवर स्टेटस टाकून ईव्हीएमवर संशय व्यक्त केल्यानंतर त्याला निलंबित करण्यात आले आहे.
यवतमाळ जिल्ह्यात ईव्हिएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे व्हॉट्सॲप स्टेटस ठेवल्याबद्दल आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवत वन विभागाच्या एका कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. पांढरकवडा येथे तैनात असलेल्या शिवशंकर मोरे यांच्यावर ही कारवाई केल्याचे चंद्रपूरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा यांनी सांगितले.
आर्णीच्या सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांनी पांढरकवडा विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) यांना लिहिलेल्या पत्रात मोरे यांच्या विरोधात ‘व्हॉट्सॲप स्टेटस’ पोस्ट करून आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, तक्रारदाराने मोरे यांच्या ‘व्हॉट्सॲप स्टेटस’मध्ये ईव्हीएमच्या परिणामकारकतेवर शंका व्यक्त केल्याचे म्हटले आहे, त्यामुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. आर्णी हा चंद्रपूर लोकसभा मतदारसंघांतर्गत येतो.
सरकारी कर्मचाऱ्याकडून अशा प्रकारचे वर्तन अपेक्षित नाही आणि ते आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन आहे, असे पत्रात म्हटले आहे. गौडा म्हणाले की, संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या अनेक वर्षापासून ‘ईव्हीएम’ शंका घेतली जात आहे. सर्वसामान्य लोकांपासून तर राजकीय पक्षांच्या नेत्याकडूनही ईव्हीएमवर शंका घेण्यात आली आणि ‘ईव्हीएम’ऐवजी ‘बॅलेट पेपर’वर मतदान प्रक्रिया पार पाडावी,अशी मागणीही राजकीय पक्षांकडून करण्यात आली आहे. हाच धागा पकडत यवतमाळ येथील अमोलकचंद महाविद्यालयातील एका प्राध्यापकाने आपण ‘ईव्हीएम’ ऐवजी मतपत्रिकेद्वारा निवडणूक प्रक्रिया घेतल्यास मतदान केंद्राध्यक्ष म्हणून सोपविलेली जबाबदारी पार पाडण्यास तयार आहोत’ असे पत्रच थेट जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले. हे पत्र समाज माध्यमांत प्रचंड व्हायरल झाले असून, अनेकांनी या प्राध्यापकाच्या धाडसाचे कौतूक केले आहे.