नवी दिल्ली/दै.मू.वृत्तसेवा
देशात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग येत्या 14 किंवा 15 मार्च रोजी पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकीची घोषणा करण्याची शक्यता आहे. यावेळेसही निवडणुका एकूण सात टप्प्यात होण्याची शक्यता मागील निवडणुकीप्रमाणे यंदाही सात टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पाडली जाईल, असे समजते.
जून 2024 मध्ये 17 व्या लोकसभेचा कार्यकाळ पूर्ण होणार असल्याने निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची तयारी सुरू आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 14 किंवा 15 मार्च रोजी निवडणूक तारखांची घोषणा होईल. सात टप्पांत होत असलेल्या मतदान प्रक्रियेची सुरुवात एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मे महिन्यात निवडणूक निकाल घोषित केला जाईल.
पहिला टप्प्यात जम्मू आणि कश्मीर, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, मिजोरम, नगालँड, ओडिशा, सिक्किम, तेलंगाणा, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, अंदमान, लक्षद्वीप. दूसरा टप्प्यात- आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगढ, जम्मू आणि कश्मीर, कर्नाटक, महाराष्ट्र, मणिपूर, ओडिशा, तमिलनाडु, त्रिपुरा, यूपी, पश्चिम बंगाल आणि पुडुचेरी. तिसरा टप्प्यात आसाम, बिहार, छत्तीसगड, गुजरात, गोवा, जम्मू आणि कश्मीर, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, ओडिशा, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, दादरा आणि नगर हवेली, दमन आणि दीव मध्ये निवडणूका होण्याची शक्यता आहे.
चौथा टप्प्यात बिहार, उत्तर प्रदेश, जम्मू आणि कश्मीर, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, राजस्थान, पश्चिम बंगाल. पाचवा टप्प्यात राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, जम्मू और कश्मीर, झारखंड, मध्य प्रदेश. सहावा टप्प्यात बिहार, हरियाणा, झारखंड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली-एनसीआरअ आणि सातव्या टप्प्यात उत्तराखंड, झारखंड, मध्य प्रदेश, पंजाब, बिहार, पश्चिम बंगाल, चंडीगढ, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेशात निवडणुका होऊ शकतात.